लाडकी बहीण योजना: महिलांना ₹५०,००० पर्यंतचे कर्ज - अजित पवार
"लाडकी बहिण योजना: महिलांना ५०,००० कर्जाची संधी, हप्ते थेट योजनेतून वळते – अजित पवार यांची घोषणा"
बारामती येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या विचारात घेतला आहे. हे कर्ज महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी मदतीचे ठरेल, असे अजित दादा पवार म्हणाले. यामधील कर्जाचे हप्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निधीतून वळते केले जाऊ शकतील, म्हणजेच महिलांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही.असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले.
%20(1).png)
याशिवाय, राज्य सरकारने महायुतीच्या नेतृत्वात ‘सौर ऊर्जा पंप योजना’ देखील सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सुमारे ८.०८ लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले, ज्यासाठी तब्बल २४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याचबरोबर, पंतप्रधान सूर्यगृह योजना देखील प्रभावीपणे राबवली जात असून, ३० हजार घरांमध्ये ५०० मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसवण्यात आले आहेत. यासाठी १,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात आली आहे.
या कार्यक्रमादरम्यान मुढाळे गावात विद्युत उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यावेळी बोलताना पवारांनी सांगितले की, या योजनेमुळे राज्य सरकारवर जवळपास ४५,००० कोटी रुपयांचा खर्च होत असला, तरी गोरगरीब महिलांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळतो आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी एक नवा आर्थिक आशावाद घेऊन आली आहे.
%20(1).png)
महिलांसाठी सुवर्णसंधी: लघुउद्योगासाठी ५० हजारांचे कर्ज आणि सौर ऊर्जा योजनांचे फायदे
गोरगरीब आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी राज्य शासनाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना थेट आर्थिक मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट दिसून येते.याशिवाय, राज्य सरकारने महायुतीच्या नेतृत्वात ‘सौर ऊर्जा पंप योजना’ देखील सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सुमारे ८.०८ लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले, ज्यासाठी तब्बल २४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याचबरोबर, पंतप्रधान सूर्यगृह योजना देखील प्रभावीपणे राबवली जात असून, ३० हजार घरांमध्ये ५०० मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसवण्यात आले आहेत. यासाठी १,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात आली आहे.
Post a Comment